स्मिता बाबरे (मुख्य संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे : राज्यात सर्व दूर पावसाचे प्रमाण कमी जास्त आहेत परंतु बोगस खते व बियाणे तयार करून शेतकरी वर्गाचे फार मोठ्या प्रमाणावर प्रचंड नुकसान करण्याचे श्रेयंत्र जाणीवपूर्वक चालू आहे का हा प्रश्न सध्या राज्यामध्ये निर्माण झाला आहे.
राज्यामध्ये अनेक शेतकरी उपासमारी मुळे व प्रचंड कार्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत आहेत. यातच या कंपन्यांची भर आणखीन पडत आहे.
यातील काही कंपन्या जाणीवपूर्वक दर्जाहीन खते कीटकनाशके व बी बियाणे तयार करून भरमसाठ मोठ्या प्रमाणावर व चढ्या भावाने त्याची विक्री शेतकरी वर्गाला होत आहे. अशा कंपन्यांवर शासनाचा अंकुश असायला हवा म्हणूनच संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर गजानन पारधी यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा व शहर यांच्या वतीने माननीय कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना लेखी निवेदन देण्यात आले.
पुढील काळामध्ये अशा प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके तयार करणाऱ्या कंपन्या विरुद्ध कारवाई करून अशा कंपन्या कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश देण्यात यावे व. आगामी काळामध्ये शेतकऱ्यांसाठी बी बियाणे कीटकनाशके व खते पुरवणाऱ्या कंपन्याविरुद्ध योग्य ती कारवाई करावी व शेतकरी राजाला चांगल्या प्रकारचे दर्जेदार असे खते बी बियाणे कीटकनाशके उपलब्ध करून द्यावेत ही देखील मागणी यावेळी करण्यात आली या प्रमुख मागणीसाठी संभाजी ब्रिगेड मध्य जिल्हाध्यक्ष शिवश्री उत्तमबापू कामठे उत्तर जिल्हाध्यक्ष शिवश्री चंद्रशेखर घाडगे पुणे महानगर अध्यक्ष शिवश्री अविनाश मोहिते यांच्यामार्फत कृषी आयुक्त यांना पत्र देण्यात आले.

إرسال تعليق