7 ऑगस्ट रोजी साखर कामगारांचा साखर आयुक्त कार्यालय पुणे येथे धडकणार मोर्चा.
प्रतिनिधी- सोमनाथ खिलारे (भवानीनगर -सणसर )
महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांना यापूर्वी झालेल्या वेतन वाढ व सेवाशर्तीचे त्रिपक्षीय कराराची मुदत 31 मार्च 2024 रोजी संपुष्टात आल्याने उद्योगातील व उपपदार्थ निर्मितीमधील कामगारांना नव्याने 40% पगार वाढ व अन्य सेवा शर्ती मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन. राज्य सहकारी साखर कारखाना संघ यांना बदलाची नोटीस देऊन कामगारांना पगार वाढ व सेवाशर्ती मिळणे बाबत सतत पाठपुरावा करूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व साखर कामगार महाराष्ट्र संघ यांनी संयुक्तपणे साखर कामगारांचे जिल्हा मेळावे घेऊन राज्यातील साखर कामगारांनी भव्य इशारा मोर्चाचे बुधवार दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी आयोजन करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना येथील बहुसंख्य कामगार सहभागी होण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे उपाध्यक्ष श्री युवराज यांचे उपस्थितीत पार पडले. यावेळी युनियनचे पदाधिकारी सतीश गावडे, रामचंद्र चोपडे, सुहास निंबाळकर, संजय मुळीक, स्वप्निल गावडे, लक्ष्मण टकले, जनार्दन इंगळे यांच्यासह सर्व कामगार वर्ग उपस्थित होते.-----* मोर्चातील प्रमुख मागण्या 1)- साखर व जोडधंद्यातील कामगारांना 40 टक्के पगार वाढ देण्यात यावी.-2)- साखर उद्योगातील रोजंदरी कंत्राटी कामगारांना करारातील तरतुदीनुसार व कुशल कामगारांच्या वेतनाप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे.-3)- साखर कामगारांचे तिकीट वेतन मिळावे. व कायद्याप्रमाणे प्रति महिना पगार मिळावा.-4)- खाजगी कामगारांना वेतन मंडळाचे कराराप्रमाणे वेतन मिळालेच पाहिजे.-5)- भाडेतत्त्वावरील कारखान्यातील थकीत देणे त्वरित मिळाले पाहिजेत.

إرسال تعليق