शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

राज्य शासनाचा मोठा निर्णय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार वाढले


 विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र पोलीस न्यूज

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार वाढलेला आहे आणि याचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे. तर किती वाढला पगार ते पाहण्यासाठी तुम्हाला खालील लिंक दिलेली आहे किती तुम्हाला कळेल तुमचा पगार किती हजाराने वाढला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ६१ प्रमाणे ग्रामपंचायतीला त्यांच्या आवश्यकतेनुसार कर्मचारी नेमण्याचे व त्यांचे वेतन ठरविण्याचे अधिकार आहेत. सध्या या विभागाच्या वाचा येथील क्र.२ च्या दि. ३०.१०.२०१३ च्या पत्रान्वये उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या क्र. किवेअ२०१३/५२/प्र.क्र. २७/ कामगार- ७, दि. ७ ऑगस्ट २०१३ च्या अधिसूचनेतील तरतुदी लागू करून त्याद्वारे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन दर लागू करण्यात आले आहेत. 

       अधिसूचनेद्वारे पुनर्निधारित केले जातात. त्यानुषंगाने १० ऑगस्ट २०२० रोजी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने सुधारित अधिसूचना निर्गमित केली आहे. त्यानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या दि. १० ऑगस्ट २०२० च्या अधिसूचनेला अनुसरून सुधारित दर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Post a Comment

Previous Post Next Post